मुलीचे पालकास पत्र

0

यावल:- मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अंकित सर यांच्या संकल्पनेतून बाल संस्कार विद्या मंदिर यावल या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पोस्ट कार्ड घेऊन त्यावर आपल्या पालकास पत्र लिहिण्यात आले . ज्या मध्ये त्यांना त्यांचे शिक्षण चालु ठेवून आयुष्यात काय बनायचे आहे जेणे करून त्यांना शाळा सोडावी लागू नये. त्यांना भविष्यात कोणते करिअर करायचे आहे . त्यांना भविष्यात काय बनायचे आहे किंवा त्यांची काय इच्छा आहे हे पत्राने पालकांना कळविले. तसेच १५ ऑगष्ट २०४७ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण होईल. त्या दृष्टीने देशाच्या विकासात माझे काय योगदान राहिल या बाबत ही पत्रात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सदर पत्र मुलींनी एकत्र करून विषय शिक्षक राजेद्र फालक व सविता वारके यांच्या मदतीने पोष्ठ ऑफिसात दाखल केले .